अमावस्या अशुभ दिवस आहे काय?
एखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल असेल तर अशुभ अशी ढोबळ संकल्पना आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात एखाद्या दिवशी भारत हरला तर तो दिवस त्या अनुषंगाने भारताला अशुभ व पाकिस्तानला शुभ झाला. हीच गोष्ट उलट घडली तर तो दिवस भारताला शुभ व पाकिस्तानला अशुभ. सौद्यांमध्ये वा सट्टेबाजी मध्ये एखाद्याचा फायदा हा दुसऱ्याचा तोटाच असतो. त्यामुळे एखाद्याचे शुभ हे दुसऱ्याचे अशुभ असू शकते.
तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ दाही दिशा ।। अमावस्याच काय पण कुठलाही दिवस अशुभ नाही. दक्षिण भारतात अमावास्या शुभ मानली जाते. कारण अमावस्या म्हणजे सूर्य चंद्र युती. सूर्य चंद्र बरोबरच उगवतात व बरोबरच मावळतात. युतीत ग्रहांची फले वृद्धिंगत होतात. अशी ज्योतिषशास्त्रात संकल्पना आहे. आपल्याकडे मात्र अमावस्या अशुभ मानतात. अजून गमतीची गोष्ट अशी की दिवाळीत लक्ष्मीपूजन मात्र अमावस्येच्या दिवशी असते. म्हणजे एकच दिवस स्थलसापेक्षतेने, व्यक्तिसापेक्षेने शुभ किंवा अशुभ होतो.
स्त्रोत - येथे पहा.